For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

राजकीय कुटणीतीनेच आमदार गोपीचंद पडळकर मंत्रिपदापासून दूर : अनिल सूर्यवंशी

11:30 AM Dec 19, 2024 IST | Admin@Master
राजकीय कुटणीतीनेच आमदार गोपीचंद पडळकर मंत्रिपदापासून दूर   अनिल सूर्यवंशी
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : गोपीचंद पडळकर यांच्यामुळेच ज्यांना ‘जाणता राजा’ असं समजलं जातं अशांना सुद्धा आपला वेगळा झालेला पक्ष एकत्रित करण्याची वेळ आली आहे. म्हणजेच आम. गोपीचंद पडळकर या शक्तीचा धगाटा साधासुधा नाही हेच प्रतिबिंबित होत असल्याची भावना युवा नेते अनिल सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

Advertisement

Advertisement

यावेळी अनिल सुर्यवंशी म्हणाले कि, बहुजन ह्रदयसम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाची ताकद आणि त्यांच्या कार्याची जनमानसावर असलेली छाप खूप काही सांगून जाते. शरद पवार यांच्यासारख्या धुरंधर नेत्याने सांगली जिल्ह्याचा राजकीय तोल सांभाळण्यासाठी घेतलेली ही रणनीती पडळकर यांच्या लोकप्रियतेची साक्ष आहे.

Advertisement

Advertisement

राष्ट्रवादीच्या भागांचे विलिनीकरण, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट ही फक्त पडळकर यांना मंत्री होण्यापासून रोखण्यासाठी केलेली धडपड दर्शवते. पडळकर यांची ताकद प्रत्यक्ष राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता ठेवते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानेही हे स्पष्ट होते की, भाजपला पडळकर यांच्यात एक उगवता नेता दिसतो आहे, ज्याचा भविष्य उज्ज्वल आहे.

Advertisement

गोपीचंद पडळकर यांनी एका गरीब कुटुंबातून पुढे येत, आपल्या संघर्षाने आणि कामाने सांगली जिल्ह्यात जनतेत विशेष विश्वास निर्माण केला आहे. त्यांचं नेतृत्व हे राजकीय समीकरणांना हादरा देणारं ठरत आहे, आणि म्हणूनच विरोधक त्यांना रोखण्यासाठी इतकी मोठी रणनीती आखत आहेत. हा प्रकार राजकारणातील चुरस, नेतृत्वातील ताकद, आणि नव्या नेतृत्वाच्या उदयाची जाणीव करुन देणारा आहे. गोपीचंद पडळकर यांचे कार्य अधिक उंची गाठेल, असेच संकेत मिळतात.

सांगली जिल्ह्याच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील, स्व.राजारामबापू पाटील, स्व.पतंगराव कदम, माजी मंत्री जयंतराव पाटील, आणि स्व.आर.आर. आबा पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांनी आपली छाप सोडली आहे. हे नेते जिल्ह्याच्या राजकीय इतिहासाचा महत्त्वाचा भाग होते, आणि त्यांच्या काळात मंत्रीपदांसोबतच त्यांनी विकासकामे आणि पक्षीय संघटन मजबूत करण्याचे काम केले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सांगलीला मंत्रीपद कमी प्रमाणात मिळाले आहे, आणि त्याचा परिणाम जिल्ह्याच्या राजकीय ताकदीवरही दिसून आला आहे.

गोपीचंद पडळकर यांच्याकडून कार्यकर्त्यांना आणि जनतेला अपेक्षा होत्या की, ते मंत्री होऊन सांगलीच्या राजकारणात नवसंजीवनी देतील. त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वाने जिल्ह्याच्या विकासाला आणि जनतेच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याला गती मिळेल, अशी आशा होती. पण काही कारणांमुळे ते सध्याच्या मंत्रीमंडळात स्थान मिळवू शकले नाहीत, हे खेदजनक वाटते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान, "गोपीचंद पडळकर यांना भविष्यात मोठी संधी मिळेल," हे महत्त्वाचे आणि आश्वासक आहे. भाजप पक्षाने घेतलेला निर्णय अंतिम असतो, आणि त्यानुसार योग्य वेळी योग्य व्यक्तीला संधी दिली जाते, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम ठेवून आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर विश्वास ठेवून पुढे वाट पाहणे महत्त्वाचे ठरेल.

गोपीचंद पडळकर यांच्या धडाडीच्या आणि प्रामाणिक कार्यपद्धतीवर विश्वास आहे की, ते भविष्यात मंत्री होऊन सांगली जिल्ह्याचे नेतृत्व अधिक प्रभावीपणे करतील. त्यांच्या लोकप्रियतेने आणि कामगिरीने त्यांना लवकरच मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी अपेक्षा आहे.

Tags :