For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

काम मिळत नसल्याने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याची आत्महत्या ; मराठी कलाविश्वात शोककळा

11:43 AM Jun 21, 2025 IST | Admin@Master
काम मिळत नसल्याने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याची आत्महत्या   मराठी कलाविश्वात शोककळा
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज | मुंबई
मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून आपला वेगळा ठसा उमटवणारा आणि लेखक म्हणूनही ओळख मिळवणारा अभिनेता तुषार घडीगावकर याने काम न मिळाल्याच्या मानसिक तणावातून आत्महत्या केली आहे. त्यांच्या या दुःखद निर्णयाने संपूर्ण मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून तुषारचे चाहते, सहकलाकार आणि मित्र परिवार हळहळ व्यक्त करत आहेत.

Advertisement

🎭 अनेक चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवर योगदान

तुषार घडीगावकर हे नाव प्रामुख्याने भाऊबळी या चित्रपटामुळे घराघरांत पोहोचले होते. त्यानंतर लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, उनाड, झोंबिवली, संगीत बिबट आख्यान, हे मन बावरे, अलटी पालटी सुमडीत कलटी अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपट, नाटके व मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. अभिनयासोबतच तुषार यांची लेखनकौशल्यही उल्लेखनीय होते.
मराठी कलाक्षेत्रात सातत्याने संघर्ष करत, स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचा तुषारचा प्रयत्न सुरू होता. मात्र, गेल्या काही काळात काम न मिळाल्यामुळे आणि आर्थिक समस्यांमुळे ते नैराश्यात गेले होते, अशी माहिती समोर येत आहे.

Advertisement

🙏मित्रांकडून हळहळ, सोशल मीडियावर श्रद्धांजलींचा वर्षाव

तुषारच्या आत्महत्येने अनेक सहकलाकारांना धक्का बसला आहे. चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवे याने सोशल मीडियावर तुषारला श्रद्धांजली वाहताना लिहिले –
"मित्रा का? कश्यासाठी? काम येतात जातात! आपण मार्ग काढले पाहिजे, पण आत्महत्या हा मार्ग नाही! मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे, पण हा निर्णय नाही होऊ शकत. Tushar Ghadigaonkar तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो."

Advertisement

अनेक नामवंत कलाकारांनी देखील सोशल मीडियावर तुषारच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Advertisement

मनोरंजन सृष्टीतील तणावाकडे पुन्हा एकदा लक्ष

तुषार घडीगावकरच्या आत्महत्येने मनोरंजन सृष्टीतील कलाकारांवर असलेल्या मानसिक तणावाची आणि अस्थिरतेची गंभीरता अधोरेखित केली आहे. सतत बदलणाऱ्या स्थिती, न मिळणारे प्रकल्प, अनिश्चित उत्पन्न यामुळे अनेक कलाकार मानसिक ताणाखाली असतात. तुषारसारखा प्रतिभावान कलाकार या तणावाला बळी पडतो, तेव्हा समाज म्हणून या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

Advertisement

Tags :